HW News Marathi
मुंबई

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

मुंबई | राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता १ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचे अध्ययन ३० एप्रिल पर्यंत सुरु ठेवण्याचे राज्य विद्या प्राधिकरणाने काढलेले पत्रक मागे घेण्यात येत आहे अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली.
हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला होता. आवश्यकता भासल्यास पुढील शैक्षणिक वर्षात लागू करु, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी स्पष्ट केले. परीक्षा संपल्या सुट्टीचा बेत करणा-या विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण विभागाने चांगलाच दणका दिला होता.
दरवर्षी परीक्षा संपली की उन्हाळी सुट्टी सुरू होते. १ मे रोजी निकाल लागल्यानंतर महिनाभर सुट्टी देण्यात येते. मात्र हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पहिली ते नववीच्या शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले होते.
या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावी असे आदेश देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी होती. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता १ली ते ९वी च्या विद्यार्थ्यांचे अध्ययन ३० एप्रिल पर्यंत सुरु ठेवण्याचे राज्य विद्या प्राधिकरणाने काढलेले पत्रक मागे घेण्यात येत आहे अशी घोषणा तावडे यांनी आज विधान परिषदेत केल्याने विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधानपरिषदेच्या चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न

News Desk

चर्चच्या महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे

News Desk

घाटकोपर विमान दुर्घटना आणि ते दोघे

News Desk
मुंबई

उद्धव ठाकरे घेणार आज मुख्यमंत्र्य़ांची भेट

News Desk

मुबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेणार आहेत. शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रारी केले आहेत.

त्यामुळे आमदारांच्या प्रलंबित मागण्या व त्यांची कामे होण्यासाठी ठाकरे फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्व आमदार मुंबईत आहेत. अधिवेशनाच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुखांकडे आपापल्या तालुक्यातील व भागातील विविध प्रलंबित प्रश्नांची जंत्री दिली होती.

त्यामुळे आमदार आपापल्या गावाकडे जाण्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदार विधीमंडळ परिसरात उपस्थित असतील.

Related posts

यंदा कितीही थर लावा; न्यायालयाने निर्बंध हटविले

News Desk

अण्णाभाऊ साठेंच्या वारसदारांचे उद्यापासून उपोषण

News Desk

अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यास न्यायालयाचा नकार

News Desk