HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारविरोधात चार पक्षांचा अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली | मोदी सरकारविरोधात आतापर्यंत चार पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखले केले आहेत. मंगळवारी हे प्रस्ताव संसदेच्या पटलावर येण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलगु देसम पार्टी (टीडीपी), वायएसआर काँग्रेस,काँग्रेस आणि सीपीएम यांचा समावेश आहे. वास्तविक या अविश्वास प्रस्तावामुळे केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकारला कसलाही धोका नाही. भाजप अध्यक्ष अमित शहांनी म्हटेल आहे की, अविश्वास प्रस्तावाचा सामान करण्यासाठी सरकार तयार आहे, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. दुसरीकडे, वायएसआर काँग्रेसने समोवारी म्हटले आहे, की त्यांचे सर्व खासदार राजीनामा देणार आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“पश्चिम बंगालमध्ये माता बॅनर्जींचा विजय झाला तर मोदी-शहांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा”

News Desk

सीआरपीएफचे देशाच्या सीमा सुरक्षेसह अंतर्गत सुरक्षा ठेवण्यात महत्वाचं योगदान-गृहमंत्री अमित शहा

News Desk

‘हिंदी ही राष्ट्रभाषा’ राज्य सरकारच्या ‘या’ जीआरमुळे नवा वाद

Aprna
देश / विदेश

आयोगाच्या आधीच भाजप आयटी सेल प्रमुखानं जाहीर केली मतदानाची तारीख

News Desk

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी मतदान, तर १५ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकाच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर करण्याआधीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विट हँडलवरुन तारखा जाहीर केल्या.

अमित मालवीय यांनी ’१२ मे रोजी मतदान तर १८ मे रोजी मतमोजणी’ होईल, असे ट्विट त्यांनी केले होते. मात्र त्यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर काहीक्षणातच निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयोगानुसार १२ मे रोजी मतदान तर १५ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर होण्याआधीच भाजपने ट्विट केल्यामुळे अमित मालवीय यांना ट्विटरवर ट्रोल केले गेले. त्यानंतर अमित मालवीय यांनी टाइम्स नाऊ चॅनेल पाहून ट्विट केल्याचे स्पष्टीकरण ट्विटरवरुन दिले.

  • निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आश्वासन

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी भाजपा कसे काय निवडणुकीच्या तारखा जाहीर करु शकते. असा सवाल पत्रकारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांना विचारला. या प्रकरणाची चौकशी करुन योग्यती कारवाई करण्याचे आश्वासन ओमप्रकाश रावत यांनी पत्रकारांना दिले.

Related posts

राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे? चीन घुसखोरीवरुन सेनेचा सवाल

News Desk

सनी देओलची खासदारकी येणार धोक्यात ?

News Desk

एकच रेशन कार्ड संपूर्ण देशात चालणार

swarit