HW News Marathi
देश / विदेश

सीआरपीएफचे देशाच्या सीमा सुरक्षेसह अंतर्गत सुरक्षा ठेवण्यात महत्वाचं योगदान-गृहमंत्री अमित शहा

नांदेड | सीआरपीएफ मुळे आपला देश सुरक्षित आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासह अंतर्गत सुरक्षा ठेवण्याचं काम जा जवानांनी केलं आहे. सर्व कामी सहजपणे आपली जबाबदारी सांभाळली. कुठलीही जबाबदारी सहजपणे सांभाळून खरे उतरले आहेत. देशाचा झेंडा आकाशी फडकविला आहे. आपल्याशिवाय अंतर्गत सुरक्षा शक्य नाही. देशात जो विकास होत आहे. आपला त्याग आणि बलीदानातूनच हे शक्य झाले. तसेच प्रत्येक सैनिकांनी एका वृक्षाची लागवड करावी असे आवाहन भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान-२०२१ अंतर्गत एक कोटी वा पिंपळाचा वृक्ष गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लागवड करण्यात आले. त्यावेळी सैनिक संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, यावर्षी सैनिकांच्या माध्यमातून एक करोड वृक्ष लागवड करू हा संकल्प व्यक्त केला होता. आज माझ्या हातून हा शेवटचा वृक्ष लावून आज ते लक्ष्य पूर्ण केले आहे. आज नरेंद्र मोदीं यांच्या वाढदिवसानिमित्त हे लक्ष्य पूर्ण केले याचा आनंद आहे तसेच मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिवस आहे. सरदार पटेल यांनी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करून हा भाग भारतात सामील केला. या भागाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मुक्तीदिनाच्या मराठवाडा आणि तेलंगणातील शुभेच्छा देतो. अनेक स्वतंत्र सैनिकांनी लढून आणि बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो भारताचे गृहमंत्री अमित शहा असे म्हणाले.

पर्यावरण खात्याला मोदी मुळे महत्व..!

नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका आहे. पहिल्यांदा गुजरातमध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना पर्यावरण खात्याला महत्व आणले. पर्यावरणाच्या बाबतीत जग परेशान आहे. सध्या अतिवृष्टी आणि दुष्काळ याचाच भाग आहे. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. ओझोनचा स्थर कमी होत आहे. तापमान वाढले तर या जगात मनुष्यहानीसह कुठलाच प्राणी जिवंत राहणार नाही. विकासा सोबतच पर्यावरण आणि जलसंवर्धन करणे आवश्यक आहे. असे म्हणाले.

दोन वर्षात मोठा प्रमाणात वृक्ष लागवड…!

दोन वर्षात अनेक कार्यक्रम घेतले आहेत. गतवर्षी एक कोटी 30 लाख वृक्ष लावले. आणि यावर्षीचे एक कोटी वृक्ष लावले. वृक्ष लागवडी नंतर मनाला समाधान मिळते. वृक्ष लावणे शासनाचे काम त्यांचे संवर्धन करण्याचे काम सैनिकांनी करावे. असे आवाहन केले.

सर्व वृक्षात पिंपळाचे वृक्ष चांगले असून ऑक्सिजन देतो. कार्यक्रम सुरू करतानाही अशाच वृक्षांची लागवड केली पाहिजे अशी संकल्पना व्यक्त केली होती. त्याला आपण साथ दिली. त्यामुळे साठ टक्के वृक्ष लागवड झाले आहेत. प्रत्येक सैनिकांनी एका वृक्षाची लागवड करावी असे आवाहन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

राज्यात सध्या २ मुख्यमंत्री, अजित पवारांना अपयशी ठरविण्याचे प्रयत्न सुरु !

News Desk

विनायक मेटे फडणवीसांच्या इशाऱ्यावर जनतेची दिशाभूल करतायत !  

News Desk