HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : एअर फोर्सच्या सी-१७ या विमानातून काश्मीरमध्ये ८ हजार तुकड्या रवाना

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविले असून राज्याची पुनर्रचना करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाच्या आणखी ८ हजार तुकडया काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्‍या आहेत.

यात उत्तर प्रदेश, ओडिशा, आसाम या विविध भागातील निमलष्करी दलांनाइंडियन एअर फोर्सच्या सी-१७ या विमानातून जवानांना काश्मीरमध्ये आणण्यात येत आहे. यासाठी भारतीय लष्‍कर व हवाई दलालाही हाय अर्लटवर ठेवण्‍यात आले आहे. काश्मीरमध्ये कोणताही अनुसचित प्रकार घडू नये. म्हणून केंद्र सरकारने यापूर्वीच १० हजार जवानां तैनात करण्यात आले आहे. यानंतर निमलष्करी दलाच्या आणखी ८ हजार तुकडया काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्‍या आहेत. याचबरोबर स्थानिक पोलिस देखील येथे उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच ३ वाघांचा बळी

Gauri Tilekar

द्रौपदी मुर्मू: भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींबद्दल माहित नसलेल्या घटना

News Desk

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम

News Desk