HW News Marathi
देश / विदेश

#SushanSinghRajput – पाटण्याहून आलेले एसपी विनय तिवारी बिहारला परतणार

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटण्याहून आलेले एसपी विनय तिवारी बिहारला परत जाणार आहेत. मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन संपवण्याची मुभा दिली आहे. तिवारींना जबरदस्ती होम क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी आणि ४ अधिकारी २ ऑगस्टला रात्री मुंबईला आले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनय तिवारी यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले.

“बीएमसीने मेसेज करत मला कळवले आहे की मी होम क्वारंटाईन सोडून जाऊ शकतो. मी आता पाटण्याला रवाना होणार आहे”

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे बिहार पोलिसांनी विनय तिवारी यांना परतण्याचे आदेश दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिवारी यांच्यासह आलेले ४ पोलीस अधिकारी कालच पाटण्याला परतले, तर तिवारी आज (७ ऑगस्ट) निघणार आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप झाला. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ट्वीटद्वारे केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त

swarit

‘नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट, कोकणवासियांसाठी तीन महत्त्वाच्या मागण्या’

News Desk

देशाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई कोरोना पाॅझिटिव्ह, २०१९ मध्ये सुनावला होता राममंदिराचा निर्णय !

swarit