HW News Marathi
मुंबई

सरकारने लोकशाहीचा खून केला | वळसे पाटील

मुंबई | विधानसभा अध्यक्षाविरोधात प्रस्ताव दाखल झाल्यानंतर १४ दिवसांनंतर विधानसभा अध्यक्षांनी तो ठराव वाचून दाखवणे गरजेचे आहे. आम्ही पाच तारखेला या ठरावाची प्रत दिली. १९ तारखेला नोटीसीचा कालावधी संपला. २० तारखेला ही नोटीस सभागृहाला वाचून दाखवणे क्रमप्राप्त होते.

परंतु तसे घडले नाही. मुख्यमंत्र्यांनी अचानक अध्यक्षांच्या बाजुने विश्वास दर्शक ठराव मांडला व मंजूर करून घेतला. २००६ साली विलासराव देशमुख असताना असता ठराव आला होता, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झालाच नसता. तरीही सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे गरज नव्हती. सरकारने एक चूक केल्यानंतर ती झाकण्यासाठी दुसरी चूक केली. या निमित्ताने सरकारने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दोन कोटी 90 लाख जुन्या नोटांसह तीघांना अटक

News Desk

मुंबईत पेट्रोल नव्वदी पार

News Desk

विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा

News Desk
क्रीडा

सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू नरसिंग यादवने घेतली आठवलेंची भेट

News Desk

नवी दिल्ली | कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक विजेता ठरलेला भारताचा कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या नवी दिल्लीतील शास्त्रीभवन येथील दालनात भेट घेतली.

सुवर्णपदक विजेता कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांच्यावर अन्नचाचणीत दोषी आढळल्याने 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी सुरू आहे. ही चौकशी लवकर पूर्ण झाल्यास आपण निर्दोष सिद्ध होऊ असे मनोगत नरसिंग यादव यांनी यावेळी रामदास आठवलेंकडे व्यक्त केले.

तसेच कुस्तीपट्टू नरसिंग यादव हे सध्या मुंबई पोलिसात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांना मिळणारा पगार अपुरा असल्याची खंत त्यांनी रामदास आठवलेंकडे व्यक्त केली. याप्रकरणी कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य तो प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवलेंनी यांनी दिले.

 

Related posts

राज्य शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत १००० स्पर्धक सहभागी होणार

Gauri Tilekar

डॉ. रवींद्रकुमार सिंघल ठरले ‘आयर्नमॅन २०१८’

Gauri Tilekar

आयसीसीकडून तीन खेळाडूंवरील मॅच फिक्सिंगचे आरोप निश्चित

News Desk