HW News Marathi
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्राचा नेता हरपला

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. पतंगराव कदम यांच्या रुपाने राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याजवळ अंत्यविधी केले जातील.

पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्याने पतंगरावांनी पायी जाऊन प्राथमिक शिक्षण घेतलं. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. 1964 साली वयाच्या20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही, असे शरद पवार म्हणाले.

पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कामासाठी पतंगराव कायम स्मरणात राहतील, त्यांच्या जाण्याने या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे साधणार संवाद

News Desk

राणा म्हणतात, ‘मला कुठलीही नोटीस नाही’!

News Desk

फडणवीस, पटोले, वळसे-पाटील ते दीया मिर्झा, ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित

News Desk
मुंबई

सिद्धूविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक

swarit

मुंबई | भारतीय माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची घेतलेली गळाभेट त्यांच्यावरील टीकेचे मोठे कारण ठरली. अनेकांकडून याला कडाडून विरोध झाला आणि मोठ्या प्रमाणात टीका झाली. भाजपच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आझाद मैदानात सिद्धू यांच्याविरोधात मोर्चा काढला.

या मोर्चादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम म्हणाले, “आम्ही जागोजागी धरणं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सिद्धूला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही हे सुरु ठेवणार आहोत. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे.” “सिद्धूनं जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू,” असंही ते म्हणाले आहेत. मोर्चा संपल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू यांचे पोस्टर्स जाळण्याचा प्रयत्न केला तसेच सिद्धू मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या परंतु उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले.

Related posts

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान!

News Desk

नीट परीक्षेसाठी लढा देणाऱ्या तरूणची आत्महत्या

News Desk

कोरोनासारखाचं आणखी १ विषाणू समाजात आलाय, मुख्यमंत्री कोणत्या विषाणूबद्दल बोलले ?

News Desk