HW News Marathi
देश / विदेश

काही भागातील लॉकडाऊन तरी शिथिल करावा, हसन मुश्रीफांची मागणी

मुंबई | देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढत जाणारा आकडा आता आपल्यासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधानांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. १४ एप्रिलला हा लॉकडाऊनचा कालावधी संपणार असल्याने लोक या दिवसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे “१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन १००% शिथिल होईल असे गृहीत धरू नका”, असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “अनेक जण सध्या लॉकडाऊननंतर घरी राहण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत तिथे तरी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करावा”, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

“देशात सुरु असलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे अनेक जण आता १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या तयारीत नाहीत. म्हणूनच किमान जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत तिथे तरी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करावा असे माझे वैयक्तिक म्हणणे आहे. मात्र, याबबातचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील”, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, “ज्या गावातील लॉकडाऊन शिथिल केला जाईल त्या गावात बाहेरच्या कोणाला प्रवेश देऊ नये. त्या गावाच्या सीमा पूर्णपणे बंद राहाव्यात”, असेही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या हसन मुश्रीफ यांनी लॉकडाऊन संदर्भात आपले हे मत व्यक्त केले आहे.

राज्याची मंत्रिमंडळाच्या आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीत मी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन, असे देखील हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील २५ पैकी २१ जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिल्लीतील निजामुद्दीन प्रकरणाशी संबंध आला आहे. तर काही जण त्यांच्या संपर्कातही आहेत. त्यामुळे, असे आणखी कुणी असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्याबाबतची माहिती द्यावी. स्वतःसोबत इतरांनाही संकटात टाकू नये, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील ७ मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

News Desk

स्वातंत्र्य ही काश्मिरी जनतेची प्राथमिक मागणी | सैफुद्दीन सोझ

News Desk

रामजन्म भुमी वगळता कुठेही मशीद बांधता येईल- सुब्रमण्यम स्वामी

News Desk