HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिराविषयी लवकर तोडगा काढला नाही तर, भारताची अवस्था सीरीयासारखी होईल | श्री श्री रविशंकर

नवी दिल्ली | अयोध्यातील राम जन्मभूमीचा विषय तोडगा नाही काढला तर, नाही तर भारताची अवस्था सीरीयासारखी होईल’, असे वादग्रस्त विधान ऑर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर केले आहे. रविशंकर यांनी मुस्लिम आणि हिंदुमध्ये मध्यस्थी करुन यावर कोर्टा बाहेर तोडगा कारण्याचा प्रयत्न करत होते. पण अचानक त्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे नवीन वादाला तोड फुटले आहे.

गेली अनेक वर्षापासून अयोध्या राम जन्मभूमीचा मुद्दावरुन राजकारण सुरु आहे. यावर आतागत तोडगा निघाला नाही. ३० डिसेंबरला २०१०मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने मालकी हक्क प्रकरणी निर्णय दिला होता. या जमिनीचे समान तीन भागात वाटप करावे, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. पण, हा निर्णय मुस्लिम समाजाला मान्य नव्हता. या वादावर लवकर पडदा नाही पडला तर भारतात सीरीयासारखी अवस्था निर्माण होईल. अशा वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात श्री श्री रविशंकर यांच्यावर टीका होता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला मागणी आली नाही – पीयुष गोयल

News Desk

कतार ‘ओपेक’मधून बाहेर पडणार

News Desk

शशिकलाचीही सुटका होणार

News Desk