HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर सरकार पोरकटपणे वागत आहे | जयंत पाटील

विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही, जाणिवपूर्वक विरोधकांना बोलू न देण्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. मागच्या दोन अधिवेशन तसेच या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत त्याचा अनुभव आला.

महाराष्ट्रातील जनतेपर्यंत विरोधकांचा आवाज पोहोचू नये, यासाठी सभापतींतीविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. नीलम गो-हे या वरच्या सभागृहाच्या नेत्या आहे, परंतु त्यांचे नाव विधानसभेत त्यांच्या नावाची चर्चा घेतले. सुनील प्रभुंनाही बोलून गोंधळ घोलण्यास मुभा देण्यात आली.

एकूणच विधान परिषदेच्या सदस्याचे नाव रेकॉर्डवरून काढण्याला अध्यक्षांनी तत्काळ मंजुरी दिली. धनंजय मुंडे यांच्या नावे घोषणाबाजी होते, त्यांचे नाव देखील वगळण्याची गरज आहे. परंतु त्यांनी वेगळा न्याय दिला. अध्यक्षांची भूमिका पक्षपातीपाणाची राहिली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्व काही पोरकटपणा, कोणताही सुसंतपणा नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar

सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

swarit