HW News Marathi
महाराष्ट्र

निजामुद्दीन येथे झालेला प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही

नवी दिल्ली | दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकज या धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ५००हून जास्त लोकं या कार्यक्रमात हजर होते अशी धक्कादायक माहितीही समोर येत आहे. दरम्यान, दिल्लीत झालेल्या कार्यक्रमासारखा कोणताही कार्यक्रम महाराष्ट्रात खपवला जाणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. निजामुद्दीन येथे झालेला कार्यक्रम अगदी निष्काळजीपणाचा होता. तसेच, महाराष्ट्रातीलही काही जण त्या कार्यक्रमाला गेल्याने राज्याच्या आरोग्यविभागाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

या घटनेनंतर निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ बंद करण्यात आला आहे. पोलीसांकडून काल (१ एप्रिल) रात्री उशिरापर्यंत हा परिसल सील करण्यात आला आहे. कोणालाही या परिसरात प्रवेश करम्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातही मुख्यंमंत्र्यांनी विनाकारण गर्दी न करण्याचे नागरिकांना आवाहन वारंवार केले आहे. काही ठिकाणी याचे पालन काटेकोरपणे करम्यात येत आहे. पण काही ठिकाणी अजूनही कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लोकांमध्ये दिसून येत नाही आहे. त्यामूळे पावलोपावली सरकारकडून नागिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

News Desk

देगलूरच्या ज्ञान सरस्वती शाळेच्या गार्गी आणि तेजसचं दहावीच्या परिक्षेत यश

News Desk

“महिलांच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”, ठाकरे सरकारवर महिला आयोगाकडून टीका

News Desk