HW News Marathi
महाराष्ट्र

विनाकारण बाहेर निघाल तर निघेल गाढवावरून धिंड, गावकर्‍यांनी घेतला एकमुखाने निर्णय

बीड | विनाकारण गावात फिराल तर निघेल गाढवावरून धिंड कोरोना व्हायरसपासून बचावासाठी बीड जिल्ह्यातील टाकळी गावच्या गावकर्यांनी घेतला एकमुखी निर्णय, एक वेळ विनाकारण बाहेर आढळून आल्यास पाचशे रुपये दंड तीन वेळा आढळून आला तर थेट गाढवावरुन धिंड असा निर्णय घेतल्यामुळे या गावची चर्चा जिल्हाभर सुरू आहे, थेट गावात दवंडी देऊन या निर्णयाची सर्वांना माहिती देखील दिली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला असून गाव स्वच्छ ही केले आहे त्यामुळे या नियमाचे उल्लंघन करणार नाही असा विश्वासही गावच्या सरपंचांनी व्यक्त केला.

लोकडाऊनमध्ये लोकांनी बाहेर निघू नये म्हणून पंतप्रधानांपासून प्रशासनातील सर्वच अधिकारी विनंती करत आहेत. मात्र, काही रिकामटेकडे फेरफटका मारून येऊ म्हणून गावात फिरत आहेत यावरती प्रतिबंध म्हणून बीड जिल्ह्यातील टाकळी गावातील सरपंचांनी आगळीवेगळी शक्कल लढवली

गावातील प्रमुख बैठकीच्या ठिकाणी ऑईल आणि डांबर टाकून ही ठिकाणे काळी केली आहेत, एवढेच नाही तर कोरोना पासून खबरदारी म्हणून गावातील कोणीही विनाकारण फिरताना दिसून आल्यास पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे, वारंवार सांगूनही तोच व्यक्ती तीन वेळ आढळून आला तर त्याची गाढवावरून धिंड काढण्यात येणार असल्याची दवंडी देखील सरपंचांनी दिली आहे, त्यामुळे कोरोना आणि गाढवावरून धिंड टाळायचे असेल तर कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये असा सल्लाही गावच्या सरपंचांनी दिला आहे तर या निर्णयाचे सर्व गावकरी कडून स्वागत केले जात आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आघाडी सरकारच्या काळात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी | पृथ्वीराज चव्हाण

swarit

तर मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन – बच्चू कडू

News Desk

अखेर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुहूर्त ठरला

Gauri Tilekar