HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

मुंबई । युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून (१८ जुलै) सुरुवात होणार आहे. या यात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यातून होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान नाही केले, त्यांची मने जिंकणे या यात्रे मागचे हे ध्येय आहे.

महाराराष्ट्र भर ही जन आशीर्वाद यात्रा काढली जाणार असून या यात्रेचा पहिल्या टप्प्यात १८ ते २२ जुलै या पाच दिवसांच्या काळात जळगाव-नाशिक-धुळे-अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. जन आशीर्वाद यात्रा हा साधारण चार हजार किलोमीटरचा प्रवास आदित्य ठाकरे करणार असून समाजातील प्रत्येक घटक, युवाशक्तीशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

अस आहे जन आशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा

  • १८ जुलै – जळगाव
  • १९ जुलै – धुळे, मालेगाव
  • २० जुलै – नाशिक शहर
  • २१ जुलै – नाशिक ग्रामीण, नगर
  • २२ जुलै – नगर, श्रीरामपूर, शिर्डी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूरमध्ये एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात दरीत बस कोसळली

News Desk

शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार -गृहमंत्री

News Desk