HW News Marathi
देश / विदेश

मोदींचा घोटाळा

पी. रामदास
मूळचा गुजराती असलेल्या निरव मोदी तीन दिवसापासून चर्चेत आहे. त्याचे कारण सर्वश्रुत आहेच. त्याने एका बँकेला हजारो कोटींचा गंडा घातला आहे. परंतु हा घोटाळा केवळ एकट्याचा नसून त्यामागचे अनेकांचे हात आहेत. पहिला आणि महत्वाचं म्हणजे निरवचे आडनाव नाव आणि त्याचे आंबानीपासून पंतप्रधान मोदी सोबत असलेली ओळख. याचं ओळखीतून त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावून जगभर आपले प्रस्थ उभारले आहे.
त्याचे जगभरातही हिऱ्याचे दालन आहेत. त्यासाठी त्याने कोट्यवधी कर्ज घेतले. ते घेताना कुठलीही अडचण अली नाही, कारण त्याचे वजन. कर्ज देताना बँकेला त्याच्याविषयी सर्व माहिती होती. तो घोटाळा करू शकतो हे ही माहित असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी तो परदेशात पळून जाण्यात यशश्वी झाला.
हा निर्वान मोदी दावोस येथील परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत होता. त्यामुळे या घोटाळ्यात त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. मोदींच्या राज्यातून आलेले अनेक दिग्गज वेगवेगळ्या घोटाळ्यात अडकत आहेत. विशेष म्हणजे सर्व घोटाळेबाज पंतप्रधान यांच्या जवळील असून सर्व घोटाळे २०१७ सालापासून सुरु झालेले आहेत. मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही, असे बोलणारे पंतप्रधान मोदी अशा वेळी मात्र मूग गिळून गप्प का राहतात असा प्रश्न देशाला पडल्याशिवाय राहणार नाही.
सोयीच्या विषयावर नको ते बोलून जनतेची दिशाभूल करण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. त्या सरकारचे प्रमुख देखील त्याला खतपाणी घालत आहेत. हेच या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
निरव मोदी माल्याप्रमाणे भारत येणे शक्य नाही, त्याचे कारण त्याला नियोजनबद्ध पद्धतीने परदेशात स्थिरस्थावर केल्यानंतर हा घोटाळा बाहेर काढण्यात आलेला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला

News Desk

नव निर्वाचित खासदारांकडे या कमिटीची जबाबदारी

News Desk