HW News Marathi
महाराष्ट्र

पाणी तापवण्याच्या किरकोळ कारणावरुन सासऱ्याने सुनेचे हात तोडले

कोल्हापूर | घरात पाणी तापवण्याच्या किरकोळ कारणावरुन सासऱ्याने सुनेचे हात कोयत्याने तोडल्याची घटना घडली आहे. यासारख्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मल्हारपेठ येथील सावर्डे येथील पांडुरंग दशरथ सातपुते (७०) यांनी सून शुभांगी रमेश सातपुते (३२) हिच्या हातावर कोयत्याने वार केले.

शुभांगी यांना वाचवण्यासाठी मयुरेश आणि कनिष्का त्यांच्या मुलांनाही दुखापत झाली आहे. शुभांगी यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्या सासऱ्याला पांडूरंग सातपूते यांना कळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभांगीचे पती कामानिमित्ताने बाहेर गेले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या शुभांगी आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आठ महिने झाले,पाळणा कधी हलणार ? सेनेची राज्यपालांवर टिका!

News Desk

आरक्षणाचा खेळखंडोबा भाजपाने मांडलाय – जयंत पाटील

News Desk

“मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट शिजलेल्या बैठकीला सचिन वाझे होते हजर”, NIAने दिली माहिती

News Desk
महाराष्ट्र

गारपिठीमुळे पिकांप्रमाणे शेतकऱ्यांची घरही कोसळली

News Desk

विदर्भ | अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना खूप मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यातल्या आर्वी तालुक्यातील पिंपळझरी गावात गारपिठीमुळे ५० घरे पडली आहे. प्रभाकर रेड्डी यांच्यासाठी मंगळवारी संध्याकाळी वादळीवाऱ्यसह गारांचा पाऊस घेऊन आली.

शेती आणि रोजमंजुरी यावरच त्यांच्या संसाराचा गाडा सुरू होता. गारपिठीमुळे शेतीबरोबरच घराचे ही नुकसान झाले आहे. सध्या या लोकांची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे. गारपिठीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना कधी सरकारी मदत मिळणार यांची वाट ते बघत आहेत.

Related posts

पंकजा मुंडे पुन्हा एकदा पहिल्याच झंझावाताने राजकारणात उतरण्याच्या तयारीत!

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला

Aprna

चाळीसगावची जागा २०२४ मध्ये यायलाच हवी – जयंत पाटील

News Desk