HW News Marathi
राजकारण

मी लवकरच मंत्री मंडळात असेन | नारायण राणे

औरंगाबाद | नवीन पक्ष निर्माण केलेल्या नारायण राणे यांनी मी लवकरच मंत्री मंडळात असेन अशी आशा व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवणार असल्याच आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये असल्याचंही राणेंनी जाहीर केलं.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी एनडीएमध्ये प्रवेश केला. मंत्रीपद दाखवत भाजपनी यशस्वी डाव खेळला. राणे नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
  • काय म्हणाले नारायण राणे?

मंत्रीपदाबाबत लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घेऊ असा शब्द मुखमंत्र्यांनी मला दिला आहे. मराठवाड्याकडे १३ वर्ष मुख्यमंत्रीपद असूनदेखील मराठवाड्याचा विकास झाला नाही. मराठवाड्याच दरडोई उत्पन्न कमालीचं खालवले आहे. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पद भूषवले मात्र नांदेडचे दरडोई उत्पन्न वाढलं नाही.

सिंधुदुर्ग जिल्हाचे उत्पन्न तर जास्त आहेच मात्र जिल्हा टँकरमुक्त आहे. मराठवाड्यात अशा पद्धतीने कोणताच विचार केला गेला नाही. पन्नास वर्षे सत्तेत असणे आणि चार वर्ष सत्तेत यात फरक असून शेतकरी धोरणाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मी बोलतो ते करतो. मराठा आणि मुस्लिम आरक्षणसंदर्भात भाजपा सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याने आपण एनडीएमध्ये आहे.

काँग्रेस सोडल्यानंतर महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांपेक्षा वेगळे आणि भारतीय घटनेशी प्रामाणिक राहून जनतेसाठी काम करता यावं म्हणून मी वेगळ्या पक्षाची स्थापना केली असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. पक्षाला आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर कार्यकारणीची निवड केली जाईल आणि येणाऱ्या सर्व निवडणूक पक्ष लढविणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त | ममता बॅनर्जी

News Desk

हिंदू मतांच्या गणितासाठी भाजपच्या संकल्पपत्रात पुन्हा ‘राम मंदिरा’चा उल्लेख

News Desk

मुख्यमंत्री सर्व प्रकल्प गुजरातला घेऊन जाणार का ?

swarit
महाराष्ट्र

फ़ेसबुकवरील कुबेर ग्रुपचा आदर्श ; आजारी सदस्याला केली अवघ्या 2 दिवसात 3 लाखाची मदत

swarit

मुंबई फेसबुक हे आभासी जग असले तरी या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य होऊ शकते हे फेसबुक वरील कुबेर या समूहाने एका सदस्याला अचानक आलेल्या आजाराच्या संकटात 2 दिवसात 3 लाख रुपये मदत करून दाखवून दिले आहे.

संतोष लहामगे या संगमनेर च्या युवकाने फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील अनेक लोकं “कुबेर” नावाच्या ग्रुपवर एकत्र आनली. याच समूहाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल “तीन लाखांची” मदत गोळा करून समूहातील जयेश नलावडे या सदस्याचा उपचाराकरीता तातडीने दिली आहे. त्यामुळे, अशा या जीवनदायी मदतीचं उदाहरण देऊन या “कुबेर” समूहाने आपल्या समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

आतापर्यंत आपल्या वाचण्यात आणि पाहण्यात सोशल मीडियाचा वापर शक्यतो अपप्रचार किंवा अशांतता पसरवण्यासाठी केला जातो असंच आलेले आहे परंतु, याच गोष्टींना पुसत टाकत कुबेर समूहाचे संस्थापक संतोष लहामगे यांनी या सोशल मीडियाचं महत्व पटवून दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी जयेश नलावडे हा अचानक आजारी पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा आजार इतका वाढला की, त्याला अतिदक्षता विभागात केलं गेलं. जयेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याची माहिती समूहाचालक संतोष लहामगे यांना लागली. त्यांनी जयेशला मदत करण्याचं आवाहन समूहातील सर्व सदस्यांना केलं. त्यांनंतर लगेचच समूह सदस्यांनी मदतीचा मानस ठेवत अगदी दोन दिवसात 3 लाख रुपये मदतनिधी म्हणून गोळा केला.

या कुबेर समूहामध्ये जवळपास दहा देशात विविध क्षेत्रात काम करणारी एकूण 1700 सदस्य असून, ते नेहमी सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात. यापूर्वीही अनेकांच्या मदतीला कुबेरकर धावून आलेले आहेत.त्यासोबत हा महाराष्ट्रातील असा फेसबुक समूह आहे ज्याचे आत्तापर्यंत “सहा संमेलन” पार पाडली आहेत. जलसंधारण कामात एक गाव दत्तक, फिरते वाचनालय, हेल्पलाइन, कलाकारांना व्यासपीठ, प्रकाशन संस्था, दिवाळी अंक असे अनेक उपक्रम राबवणा-या या ग्रुप ने शाळा सुरु करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

कुबेरकरांच्या मदतीचा हात हा जयेशसाठी जीवनदानच ठरला आहे. शनिवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी समूहाचे प्रमुख संतोष लहामगे यांनी जयेशच्या आईकडे पैसे सुपूर्द केले व त्यासोबतच कुबेर समूहाच्या कोणत्याही सदस्याच्या कसल्याही अडचणीला आम्ही एकत्र येऊन त्याला तोंड देऊ असा शद्ब संतोष लहामगे यांनी येताना दिला, त्यामुळे त्यांच्या या कुबेर समूहाचं आणि त्यांच्या अशा सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता!

News Desk

मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री !

News Desk

बाळासाहेबांचे ‘हे’स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार करूया,अजित पवारांची बाळासाहेबांना श्रद्धांजली!

News Desk