HW News Marathi
अर्थसंकल्प

Budget 2019 : नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री 

मुंबई | यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (५ जुलै) संसदेत मांडला. मोदी सरकारच्या नव्या पर्वातील पहिला अर्थसंकल्पा “नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प”, सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या अर्थसंकल्पातून सादर झाला अशा शब्दात फडणवीस यांनी केले आहे.

आजच्या अर्थसंकल्पात मूलभूत रचनात्मक प्रश्नांचा विचार करतानाच त्यातून पुढच्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीचा दृढनिश्चय प्रतिबिंबित झाला आहे. पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटी गुंतवणूक करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. नवभारताची उभारणी करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी निर्णयासोबतच या अर्थसंकल्पात विशेष करून गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष केल्याचे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढील दोन ते अडीच वर्षात मोदी सरकार ग्रामीण भागात २ कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सव्वा लाख किलोमीटरचे ग्रामीण रस्ते, बचतगटांसाठी योजना, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काम करत आहे. त्यातून ग्रामविकासाचे स्वप्न साकार होणार आहे. तसेच मत्स्यसंपदा योजना, लघु उद्योग यासाठी देण्यात आलेल्या सवलतींमुळे उद्योग विकासाला फायदा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Budget2019 : अन् भाजप खासदारांनी विचारले ‘हाऊ इज द जोश ?’

News Desk

‘कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट’, अर्थसंकल्पावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

#Budget2019 : यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांना मिळणार खुशखबर ?

News Desk