HW News Marathi
अर्थसंकल्प

#Budget2019 : ‘डीअर नोमो’ तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान केलात

नवी दिल्ली | अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज (१ फेब्रुवारी) संसदेत २०१९-२० चा बजेटमध्ये सादर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने शेतकरी, असंघटित कामगार आणि करदात्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. या बजेटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “डीअर नमो’, मोदी सरकारने गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांचा अपमान केला तर आहेत, परंतु आज शेतकऱ्यांना ५०० रुपये देण्याची घोषणा केली. मात्र या योजने अंतर्गत दिवसाला १७ रुपये देऊन मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे.”

संसदेत मोदी सरकारने त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे अंतरिम बजेट आज मांडले. करदात्याला ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मोदी सरकारने सर्व सामान्य नोकरदारांना खुश केले आहे. सरकारने या अर्थसंकल्पातून लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Budget2019 : LIVE Updates अंतरिम बजेटमध्ये सामान्यांसाठी विशेष काय ?

News Desk

#Budget2019 : आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दरवर्षी ६ हजार रुपये

News Desk

Budget 2019 LIVE Updates :  सोने,चांदी, पेट्रोल-डिझेल महागणार

News Desk