HW News Marathi
देश / विदेश

बजेटमध्ये रेल्वेसाठी महत्त्वाच्या घोषणा

नवी दिल्ली | अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केले आहे. या बजेटमध्ये रेल्वेसाठी १७ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशनप्रमाणेच आता रेल्वेत ही वायफायची सुविधा देण्यात येणार आहे. यात रेल्वेच्या सोयी-सुविधांत डिजिटलाझेशन करण्यावर मोठा भर दिला आहे.

रेल्वेसाठी खालील तरतुदी

  • – मुंबई लोकलसाठी ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • – रेल्वेची अवस्था सुधारण्यासाठी रेल्वेवर 1 लाख 48 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
  • – रेल्वेच्या सगळ्या स्थानकांवरील ब्रॉडगेजचे (रेल्वे रुळ) जाळे बदलण्यात येणार आहे.
  • – वाढती लोकसंख्या पाहता मुंबईतील ९० किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे.
  • – सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.
  • – 600 रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्यात येणार आहे.
  • – 25 हजारांपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या स्टेशन्सवर सरकते जिने बसवण्यात येणार आहे.
  • – रेल्वेच्या 4 हजार किमीचे विद्युतिकरण करण्यात येईल.
  • – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उघडण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

News Desk

मेक इंडियाला धक्का, तेस्लाचा चीनसोबत करार

News Desk

मोदीच्या टपरीचे रूप पालटणार

News Desk
राजकारण

गुजरातचे पंतप्रधान मोदी, फडणवीस मटका एजंट – राज ठाकरे

News Desk

सातारा | गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले शेवटचे बजेट सादर केले आहे. २०१५ मध्ये भाजप सरकारच्या काळात जातीय दंगली होणार असल्याचा भाकीत ठाकरे यांनी केले होते’. ‘देशात आणीबाणीचे दृष्य आणणाऱ्या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका झालाय, मात्र त्यांच्या बाता हजारो कोटींच्या भाषेत सुरू झाल्यात. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव अटळ आहे, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.’

‘नरेंद्र मोदी हे केंद्रात जनतेची फसवणूक करण्याचे काम करत तर दुसरीकडे राज्यात देवेंद्र फडणवीस दररोज आकडेमोड करत आहेत. जणू हे राज्याचे मुख्यमंत्री नसून रतन खत्रीचा मटका चालवणारे एजंट अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदी आणि फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली.’ पहिल्यांदाच साताऱ्यात राज ठाकरे यांच्या उपस्थित पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ठाकरे यांनी भाषणात भाजप सरकारवर सडकून टीका केली.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण…

Aprna

निरंजन डावखरेंचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश

News Desk

संभाजी ब्रिगेडचा राजकारणात प्रवेश

News Desk