HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ८०० कोरोना संशयितांपैकी ४२ पोझिटिव्ह, आणखी काही रिपोर्ट्स येणे बाकी !

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४२ वर गेली आहे. मात्र, उपचार सुरू असणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असरल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमाना दिली आहे. राज्यात ८०० टेस्टपैकी ४२ पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी काही जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे, यामुळे राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची संकेत टोपेंनी आज (१८ मार्च) पत्रकार परिषदेतून दिली आहे.

पुण्यातील एनआयव्हीला भेट देऊत अधिकाऱ्याची चर्चा करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. कोरोना वायरस पसरू नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. लोकांनी गर्दी कमी केली नाही तर लोकल ट्रेन बंद करावी लागेल, असे माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. वर्क फ्रॉम होम देण्यास प्राधान्य दावे, अशी विनंती आरोग्यमंत्री खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे. कोरोना संशयितांसबोत दुजाभाव करू नका, असे आवाहन आरोग्यमंत्री केले आहे. तसेच बाहेरच्या देशातून आलेले आणि फक्त लक्षण असलेल्या लोकांचीचे टेस्ट होणार, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • राज्यातल्या ८०० टेस्टपैकी ४२ पाॅझिटिव्ह,अजून काही रिपोर्टस येणे बाकी.
  • पुण्यातल्या एनआयव्ही अर्थात नॅशनल इन्स्टीट्यूट ॲाफ वायराॅलाॅजी आणि नायडू हॅास्पिटलला भेट देणार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार.
  • बाहेरच्या देशातून आलेले आणि फक्त लक्षण असलेल्या लोकांचीचे टेस्ट होणार.
  • कोणीही क्रिटीकल नाही, उपचार सुरू असणाऱ्या रूग्णांची प्रकृती स्थिर.
  • संशयित रूग्णांसोबत दुजाभाव करू नका
  • सॅम्पल टेस्टींग कीट्स भारत सरकार पुरवणार
  • मुंबईकरांनी ऐकले नाही तर लोकल बंद करणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड सेंटरमधील डान्सवरुन प्रविण दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

News Desk

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे… राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – अजित पवार

News Desk

खाल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केल्यानंतर सामनातून त्यांची पाठराखण

News Desk