HW News Marathi
देश / विदेश

2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात लोकलुभावण्या घोषणांचा मारा

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. 2019च्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केंद्र सरकारने अनेक लोकलुभावण्या घोषणांचा अर्थसंकल्पात मारा केल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. मागील साडेतीन वर्षांत रोजगारीचा प्रश्न भीषण झालेला आहे. त्यामुळे आगामी काळात नोकऱ्यांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन या अर्थसंकल्पात देण्यात आले. चार कोटी गरीबांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुद करण्यात आलेली आहे. यासोबत डिजिटल शिक्षण देण्यावर सरकार भर देणार आहे.

बजेटमधील काही ठळक घोषणा

  • बडोद्यामध्ये रेल्वे विद्यापीठ उभारले जाणार
  • 40 टक्के जनतेला सरकारी आरोग्य विमा
  • अनुसूचित जाती-जमातीसाठी 56 हजार कोटींची तरतूद
  • नव्या कर्मचाऱ्यांच्या इपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम भरणार
  • 9 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा मनोदय
  • मुंबईत नव्या लोकल लाइनसाठी 40 हजार कोटींची तरतूद
  • पिकांच्या आधारभूत किमतीत दीडपट वाढ
  • 2020 पर्यंत शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचे लक्ष्य
  • किसना क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नामकरण

News Desk

वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही सर्वोच्च नागरी पुरस्कार, हे देशाचे दुर्दैव!

News Desk

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठकीत दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव मंजूर

News Desk