HW News Marathi
मुंबई

ही आपत्कालीन परिस्थिती, पालिकेला दोष देऊन चालणार नाही !

मुंबई | पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर रेल्वे तिन्ही मार्गावर वाहतूक कोलमंडली. इतकचे नाही खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकारे राहत असलेल्या वांद्रे कलानगर भागातही पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देण्यासाठी उशीर झाला.

आदित्य यांनी आपत्कालीन विभागाला भेट देऊन मुंबईतील पावसाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना आदित्य म्हणाले की, “मुंबईतील पाऊस हा नैसर्गिक आपत्ती आहे. महापालिकेची यंत्रणा नाही तर जगातील कोणतीही यंत्रणा अशा पावसासमोर हतबल होईल हे सत्य असल्याचे आदिचत्यांनी प्रसार माध्यामाशी बोलताना सांगितले. गेल्या तीन-चार दिवसात. मुंबईत प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. महापालिका यंत्रणा आणि व्यवस्थापन कर्मचारी रात्रदिवस काम करत आहेत. ही आपत्कालीन परिस्थिती आहे, यासाठी पालिकेला दोष देऊन चालणार नाही असे आदित्य म्हणाले.”

मुंबईत अनेक भागात खोदकाम सुरु असल्यामुळे पाणी साचले आहे. कलानगर आणि मातोश्री परिसरातही पाणी तुंबले. त्यामुळे सगळेच मुंबईकर पावसात अडकले तसेच मीही अडकलो, असल्याचे आदित्यांनी सांगितले. विविध ठिकाणी एका रात्रीत ४०० मिमी पेक्षा अधिक पाऊस लागल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चार कोटीसह व्हॅन घेऊन चालक फरार

News Desk

सीएसएमटी जवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

News Desk

डबलडेकर बस लवकरच होणार इतिहासजमा

Gauri Tilekar