HW News Marathi
देश / विदेश

आपचे २० आमदार अपात्र घोषित

नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. आपच्या २० आमदारांना लाभाचे पद दिल्यामुळे निवडणूक आयोगाने यांना अपात्र ठरवले आहे. २०१५मध्ये २१ आमदारांना सचिव पदावर नियुक्त केले होते.

हे लाभाचे पद असल्याचे सांगून सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल प्रशांत पटेल यांनी राष्ट्रपतीकडे या विरोधात तक्रार केली होती. राष्ट्रपतीने हे प्रकरण आयोगाकडे पाठविले होते. आयोगाकडून या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून आयोगाने शुक्रवारी २० आमदारांना अपात्र ठरविले आहे. दरम्यान आमदार जनरल सिंह यांनी गेल्यावर्षी पदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात आता २० आमदार अडकले आहे. दिल्लीत २० जागांवर पुन्हा पोटनिवडणूक होऊ शकते.

केंद्र सरकारने आमदारांना संसदीय सचिवपद देण्याचा निर्णय विरोध केला होता. हायकोर्टातही त्यांनी याला विरोध केला होता. दिल्लीत केवळ एक सांसदीय सचिव पद हे मुख्यमंत्र्यांकडे असते. आमदारांना हे पद देण्याचा कोणताही कायदा नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षण | ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा, राज्य सरकारची मोदींकडे मागणी

News Desk

बॉक्सर लवलिनाची उपांत्य फेरीत धडक, भारताला आणखी एक पदक निश्चित

News Desk

दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग

News Desk
मुंबई

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही: राणे

swarit

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण आणि कोकणातील जनतेला उद्धस्त करणारा नाणार ग्रीन रिफायनी प्रकल्प कदापि होऊ देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. प्रकल्पासाठी जमिनी अधिगृहित करण्यासाठी येथील शेतकºयांना थेट मातोश्रीमध्ये बोलावून धमकावण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. ज्या कोकणाच्या जीवावर शिवसेना वाढली, सत्तेत आली, तेथील नागरिकांना पैशांसाठी उद्धवस्त करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे राणे म्हणाले.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचे पुरावे सादर केले. राज्याचे ‘उद्योगी’मंत्री सुभाष देसाई आणि केंद्रातील अवजड उद्योगमंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाबाबत शिवसेना दुटप्पी वागत आहेत. एकीकडे विरोध दर्शवायचा आणि दुसरीकडे जमीन अधिगृहण करण्यासाठी शेतकºयांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे

Related posts

झगमगणाऱ्या ‘सीएसएमटी’ स्थानकाची वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk

निधी नको, सुरक्षित ठिकाणी घर द्या, माहुल प्रकल्पग्रस्तांची मागणी

News Desk

राज्यातील हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

News Desk