HW News Marathi
मुंबई

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही: राणे

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण आणि कोकणातील जनतेला उद्धस्त करणारा नाणार ग्रीन रिफायनी प्रकल्प कदापि होऊ देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. प्रकल्पासाठी जमिनी अधिगृहित करण्यासाठी येथील शेतकºयांना थेट मातोश्रीमध्ये बोलावून धमकावण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. ज्या कोकणाच्या जीवावर शिवसेना वाढली, सत्तेत आली, तेथील नागरिकांना पैशांसाठी उद्धवस्त करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे राणे म्हणाले.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचे पुरावे सादर केले. राज्याचे ‘उद्योगी’मंत्री सुभाष देसाई आणि केंद्रातील अवजड उद्योगमंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाबाबत शिवसेना दुटप्पी वागत आहेत. एकीकडे विरोध दर्शवायचा आणि दुसरीकडे जमीन अधिगृहण करण्यासाठी शेतकºयांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये उभी राहिली ‘माणुसकीची भिंत’

News Desk

रिलायन्सच्या कार्यालयावर कॉंग्रेसची पोस्टरबाजी

News Desk

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार दिवाळीचा बोनस

News Desk