HW News Marathi
मुंबई

डहाणूत ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

पालघर – डाहणू समुद्रात बोट बुडाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या बोटीत एकूण ४० विद्यार्थी असून त्यापैकी ३२ जणांना वाचवण्यात यश आले असून सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या बोटीत के. एल पोंडा हायस्कूलचे ४० विद्यार्थी आहेत.

यात ११वी आणि १२ विच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून हे सर्वजण सहलीसाठी गेले होते. बोट मालक महेश अंबिरे हे ४० विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेले होते . २ नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती मिळल्यानंतर प्रशासनासह स्थानिक मच्छिमारांच्या बोटी देखील विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी रवाना झाल्या. ही बोट कशामुळे बुडाली यांचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लिंग बदलून नौदलात काम करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश

News Desk

संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची मंत्रालयात जाऊन घेतली भेट

Aprna

भाजपचे धारावीत खड्डे भरो आंदोलन

News Desk