HW News Marathi
राजकारण

धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई | सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांनुसार, आज (१४ जून) मुंडे यांच्यासह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला, तसेच दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याला देखील सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी ११ जून रोजी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणाची सुनावणी देखील आजच झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आज (१४ जून) सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिस स्थानकात धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर दाखल करण्यात आल्यास गुन्ह्याला देखील स्थगिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात जाणार !

News Desk

भाजपने मित्रपक्षांना जागा ‘दाखवली’ म्हणजे ‘दिली’, उद्धव ठाकरेंचा टोला

News Desk

केरळमधील काँग्रेसचे खासदार एम.आई. शानवास यांचे निधन

News Desk