HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंचा शिवसेनेवर पुन्हा एकदा प्रहार  

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर राणे हे मुख्यमंत्र्यांवर भलतेच खुष आहेत. पण त्यांना ज्या अटीवर मंत्रिमंडळात घेतले जाणार आहे याची जाणिव त्यांना असल्याने त्याची सुरूवातच त्यांनी केली आहे. खडसे नंतर आता शिवसेनेला शिंगावर घेण्याची जबाबदारी राणेंवर असणार आहे. म्हणून राणेंची गाडी आता सुसाट सुटली आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतूक करताना शिवसेनेच्या नाकावर टिच्चून तीन वर्षे यशस्वीपणे काम केल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसेनेला डिवचताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतूक केले आहे. राणेंकडून याच गोष्टी भाजपला आपेक्षीत आहेत. त्याचीच झलक राणे यांनी दाखवली आहे. त्यामुळे भविष्यात राणे आणि शिवसेना यांचा सत्तेत राहून संघर्ष पहायला मिळणार आहे. फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने फडणवीसांचे अभिनंदन करताना राणे यांनी हे ट्वीट केले आहे. तीन वर्षे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालवले. त्यामुळे शिवसेनेला आता नाक राहीले नाही. मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा अशा आशयाचे पोस्टर त्यांनी ट्विट केले आहे. राणे यांच्या या प्रहाराला शिवसेना कशा पद्धतीने उत्तर देणार या बाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

News Desk

नियम बाजूला ठेवत भागवत कराड यांनी विमानात केले आजारी प्रवाशावर उपचार!

News Desk

“१२ आमदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या, मग वर्षभरापासून राज्यपालांनी दाबलेली यादी लोकशाहीची हत्या नाही का?”

News Desk