HW News Marathi
Uncategorized

बस अपघातात 30 ठार

काठमांडू: नेपाळमधील धादिड जिल्ह्यात शनिवारी प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत कोसळून किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. काठमांडूपासून सुमारे ७० किमी पश्चिम घाटबेसी वळणावर सकाळी पाच वाजता ही बस त्रिशुली नदीत कोसळली, अशी माहिती धादिडचे पोलीस अधीक्षक ध्रुव राज राऊत यांनी दिली. नेपाळ लष्कराचे जवान, इतर सुरक्षा दल आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी पृथ्वी राजमार्गालगत असलेल्या या अपघातग्रस्त ठिकाणावरून १६ जखमी प्रवाशांना बाहेर काढले आहे.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, बचाव पथकाने आतापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढले असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. सर्व जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी काठमांडू येथे नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दाट धुक्यामुळे एका वळणावर चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत कोसळली. या बसमध्ये ५२ प्रवासी होते, असे पोलिसांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar | देशात परिवर्तनासाठी अनकूल वातावरण !

News Desk

माझा मुलगा निर्दोष आहे, प्रद्युम्न हत्या प्रकरणात माझ्या मुलाला अडकवलं जातंय

News Desk

अर्थसंकल्पातून गाजर ही मिळाले नाही

Adil