HW News Marathi
Uncategorized

अटीतटीची एकदिवसीय मालिका भारताच्या खिशात

कानपूर: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत भारताने न्यूझीलंडवर अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 2-1 ने कब्जा केला. १४७ धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला.भारताने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली. कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्टिल यांनी यजमान गोलंदाजांवर आक्रमण केले. गप्टिल 10 धावा काढून बुमराची शिकार झाला. मात्र मुनरोने कर्णधार केन विल्यम्सनच्या साथीने गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. मुनरो आणि विल्यमसन यांनी 110 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला दीडशेपार मजल मारून दिली. दरम्यान, मुनरो (75) आणि विल्यमसन (64) ठरावीक अंतराने बाद झाल्याने किवी अडचणीत आले.

त्यानंतर रॉस टेलर (39) आणि हेन्री निकोल्स (37) आणि टॉम लेथम (65) यांनी जबरदस्त फटकेबाजी करत न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. मात्र टॉम लेथम चुकीच्या क्षणी धावचीत झाला आणि सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला. शेवटी न्यूझीलंडचा संघ विजयापासून 6 धावांनी दूर राहिला.

तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने फटकावलेल्या झंझावाती शतकांच्या जोरावर भारताने तिस?्या वनडेत न्यूझीलंडसमोर 338 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटने केलेली द्विशतकी भागीदारी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधवने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात 6 बाद337 धावा फटकावल्या.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिस?्या आणि निर्णायक वनडेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी भारताच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र, सातव्या षटकात टीम साऊदीने भारताला पहिला धक्का दिला. शिखर धवनला त्याने 14 धावांवर झेलबाद करून माघारी धाडले. शिखर धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी द्विशतकी भागीदारी करत भारताला सुस्थितीत नेले. दरम्यान रोहित शमार्ने आपले वनडे कारकीदीर्तील 15 वे शतक पूर्ण केले.

दरम्यान, रोहित शर्मा 147 धावा काढून माघारी परतला. रोहित आणि कोहलीने दुस?्या विकेटसाठी 230 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यावर विराटने एकदिवसीय कारकीदीर्तील आपले 32 वे शतक पूर्ण केले. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील 9 हजार धावांचा टप्पाही ओलांडला.

फटकेबाज हार्दिक पांड्या आज चमक दाखवू शकला नाही. तो 8 धावा काढून बाद झाला. तर विराट कोहली शतक पूर्ण झाल्यावर 113 धावा काढून साऊदीची शिकार झाला. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (25) आणि केदार जाधव (18) यांनी फटकेबाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १६० जणांना केले क्वॉरंटाईन

News Desk

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk