HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा ‘सीएए’ला विरोध, मात्र ‘एनआरसी’ला पाठिंबा

मुंबई | सुधारित नागरिकत्व कायदाविरोधात (सीएए) असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)ला त्यांचे समर्थनार्थ आहे, असे सांगत राज ठाकरेंनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला देशातील पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना समर्थन देणाऱ्यांच्या विरोधात मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी पक्षाच्या गुरुवारी (२३ जानेवारी) च्या भाषणादरम्यान सांगितले होते. यानंतर राज ठाकरे सीएए-एनआरसीला पाठिंबा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील संभ्रमवस्थेत होते. मात्र, राज ठाकरेंनी काल (२७ जानेवारी) रंगशारदा सभागृहात मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाली होती. या बैठकीदरम्यान राज ठाकरे अवघ्या १० मिनिटांत या बैठकीतून निघून गेले होते. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल त्यांना प्रश्न उपस्थित केले. यात पक्षाची भाजपबद्दलची यापुढची भूमिका काय असणार?, असे प्रश्नांचा सरबत्ती पदाधिकाऱ्यांनी केली होती. यानंतर आज (२८ जानेवारी) राज ठाकरेंची कृष्णकुंज या निवासस्थानी मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. या बैठकीत सुधारित नागरिकत्व कायदाविरोधात (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)ला त्यांचे समर्थान ही पक्षाची भूमिका असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

राज ठाकरे पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यभागी राजमुद्रा आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी (२३ जानेवारी) राज्यव्यापी महाअधिवेशन आयोजित केले होते. गोरेगाव येथील नेस्को सेंटर मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मनसेने नव्या झेंड्यातून हिंदुत्ववादी विचारांची कास धरली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र आणि राज्य असा भेदभाव योग्य नाही – रोहित पवार

News Desk

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका महाविकासआघाडी एकत्र लढणार!

News Desk