HW News Marathi
मुंबई

भाजपच्या नाना पटोलेची उद्धव ठाकरेंसोबत दोन तास चर्चा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्वपक्षीय नेत्यांना लक्ष्य करूनही पक्षाने कुठलीही दखल घेतली नसल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे विदर्भातील बंडखोर खासदार नाना पटोले आता भाजप सोडण्याची राजकीय पार्श्वभूमी तयार करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खासदार पटोले यांनी आज (शुक्रवार) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकºयांच्या मुद्यावर ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. मात्र, त्यामागे राजकीय कारण असल्याचा कयास राजकीय वतुर्ळात व्यक्त केला जात आहे. शेतकºयांच्या प्रश्नांच्या आड भाजपला अडचणीत आणून पक्ष सोडण्याची पार्श्वभूमी खासदार पटोले तयार करत असल्याचा निष्कर्ष राजकीय वतुर्ळात काढला जात आहे. अलीकडेच पटोले त्यांनी भाजपचे नाराज नेते यशवंत सिन्हा यांचीही भेट घेतली होती. तसेच पुण्यात शेतकºयांचे संमेलन आयोजित करून त्यात बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना आमंत्रित करण्याचे त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, आपण शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याचे पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST Strike: वकील गुणरत्न सदावर्ते किला कोर्टात दाखल

Manasi Devkar

‘वारा’ संस्थेतर्फे सॅनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण

swarit

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

News Desk