HW News Marathi
Uncategorized

…मग हिंदू धर्म सोडावाच लागेल !

आजमगड- जर हिंदू धर्माचार्यांमध्ये वेळीच सुधारणा झाली नाही तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकरां प्रमाणे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्धधम्माचा स्विकारू असा इशार बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे. हिंदू धर्मचा त्याग करणार हे विधान करून त्यांनी उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली केली होती याची आठवण यावेळी मायावती यांनी करून दिली. हिंदू धर्मातील अस्पृश्यतेमुळेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या घटनेनंतरही हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही. याच कारणामुळे येणाऱ्या काळात आपणही बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. देशात धर्माच्या नावावर भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. याच मुद्द्यावर भाजपला २०१९ ची निवडणूक लढवायची आहे. हिंदूत्वाचा अजेंडा भाजप पुढे नेत असून ते हिंदूना संभ्रमिती करत आहेत असा आरोपही मायावती यांनी केला. उत्तर प्रदेश निवडणूकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मायावती यांनी आक्रमक होत उत्तर प्रदेशात पून्हा एकदा पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून आपला पारंपारीक दलित आणि मुस्लिम मतदारांना पून्हा आपल्या जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय गैर: गौतम गंभीर

News Desk

अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची दडी, खरिप वाया जाण्याची भीती

News Desk

पन्नास हजारात खरेदी केलेल्या तरूणीवर बाबाचा आठ महिने बलात्कार

News Desk