HW News Marathi
देश / विदेश

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

हार्दिक पटेलचा भाजपवर हल्लाबोल

अहमदाबाद – गुजरातमधील भाजप सरकार सरकारी यंत्रणेचा गैर वापर करत असल्याचा आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी केला आहे. सरकारी यंत्रणेला हाताशी धरून माझावर पाळत ठेवली जात आहे. पाळत ठेवायला मी काय गुन्हेगार आहे का असा खडा सवाल त्यांनी भाजपला केला आहे. मी ज्या ज्या हॉटेलमध्ये जात आहे तीथली सीसीटीव्ही फुटेजे घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे. गुजरात हे प्रजासत्ताक भारतातील नेत्यांवर पाळत ठेवणारे राज्य आहे काय?, असा सवाल ही त्यांनी केला आहे. अहमदाबाद एअरपोर्ट सर्कलच्या हॉटेलमधून बाहेर पडताच सात सेकंदात गुजरात सरकारच्या गुप्तचर विभागाने माझ्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज लिक केले. मी लोकशाही भारतात राहतो. ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. मी जनतेचा आवाज बुलंद करणारा नेता आहे. मी काही गुन्हेगार नाही. मला लोकांना भेटण्याचा अधिकार आहे आणि तो मला हवा आहे. गुजरात सरकार जे काही करत आहे ते योग्य नाही. त्यात सुरक्षेसाठी म्हणून आपल्यावर नजर ठेवली जात आहे तर मग सीसीटीव्ही फुटेज कसे काय सार्वजनिक केले जात आहे असेही ते म्हणाले. ही लढाई सुरूच रहाणार आहे. भाजपला मी काही प्रश्न विचारले आहे त्याची फक्त मला उत्तर हवी आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. गुजरात विधानसभेच्या तारखा आज जाहीर होतील. त्याआधीच तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनामुळे अर्थचक्र चिखलात रुतले, अर्थव्यवस्था ढासळून नये म्हणून काही सवलती देत आहोत !

News Desk

दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक

News Desk

एअर स्ट्राईकदरम्यान दहशतवादी तळांवर ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह, गुप्तचर यंत्रणांची माहिती

News Desk
राजकारण

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk

नवी दिल्ली | ‘पंतप्रधान मोदींनी संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी. आपल्या वागणुकीतून त्यांनी सर्वांसमोर एक चांगले उदाहरण तयार करायला हवे. त्यांची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी’, असा खोचक सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना दिला आहे. ते माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

‘यूपीए सरकारच्या काळात भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मी कधीही भेदभाव केला नाही. मी पंतप्रधान असताना जेव्हा भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांचा दौरा करायचो तेव्हा माझे भाजपच्या नेत्यांसोबत चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान देखील ही गोष्ट मान्य करतील”, असेही मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सध्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींकडून विरोधकांवर टीका करताना टोकाची भाषा वापरली जात असून मनमोहन सिंग यांनी दिलेला हा सल्ला याच संदर्भाने असू शकतो, असे म्हटले जात आहे.

Related posts

राज्यातील तरुणाईच्या जोरावर आम्ही पुन्हा स्वराज्य स्थापन करणार !

Gauri Tilekar

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

News Desk

मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार | राधाकृष्ण विखे पाटील

News Desk