HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रवादीला का हवाय पियुष गोयल आणि रविशंकर प्रसाद यांचा राजिनामा 

मुंबई – केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या राजिनाम्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस केली आहे. त्याला कारणही तसचं आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा याच्या टेंम्पल इंटरप्रायझेस या कंपनीची वार्षिक उलाढालीत १६ हजारपटीने वाढ झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यानंतर अमित शहा किंवा त्यांच्या मुलाच्या कंपनीने या बाबत खुलासा करण्यासाठी पुढे येणे गरजेचे होते. पण शहा यांच्या खाजगी कंपनीचा बचाव करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल पुढे येतात हे संशयास्पद असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

एेवढेच नाही तर गोयल हे जय शहा यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्या सारखा बचाव करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. एका केंद्रीय मंत्र्याला एका खाजगी कंपनीचा बचाव करणे शोभत नाहीत. नक्कीच यात मोठा घोटाळा आहे त्यामुळे गोयल यांनी राजिनामा दिला पाहीजे अशी मागणी करण्यात आली आहे. तर कायदा मंत्री ही सर्व नियम धाब्यावर बसवून जय शहा यांच्या पाठीशी सरकारी यंत्रणा उभी करत आहेत. सरकारचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल यांनी जय यांची बाजू कोर्टात मांडावी अशी सुचना कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. सॉलिसीटर जनरल सरकारचे कायदे विषयक सल्लागार असतात. असे असतानाही त्यांना जय शहांची बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आलेत. असं करणे हे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यासारखे आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ राजिनामा द्यावा अशी मागणी केली आहे. शिवाय जय यांच्या कंपनीतील घोटाळ्याची चौकशी केली जावी अशी मागणीही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : ‘उरी’च्या कलाकारांनी देखील व्यक्त केला निषेध

News Desk

अनिल अंबानींकडून काँग्रेस, नॅशनल हेरॉल्डविरुद्धचा मानहानीचा खटला मागे

News Desk

Republic Day | हे आहेत आतापर्यंतचे परराष्ट्रीय प्रमुख पाहुणे

News Desk