HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का? संजय राऊत म्हणाले….

नवी दिल्ली | दिल्लीत सामूहिक बलात्काराचं पुन्हा भयंकर प्रकार घडला आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीडित मुलीच्या आई- वडिलांचा फोटो ट्विट करत त्यांनी समर्थन दर्शवलं आहे. आता यावरून वाद निर्माण झाले आहेत. मात्र हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणं हा गुन्हा आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

ही तर हुकूमशाहीच झाली

राहुल गांधींनी फोटो ट्विट केला यावरून आता राजकारण पेटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावरून राहुल गांधींजी बाजू मांडली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर त्या कुटुंबासोबतचा फोटो टाकला. हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्रं लिहिलं आहे. हा काय प्रकार आहे. ही तर हुकूमशाहीच झाली. त्या कुटुंबाची माहिती विरोधी पक्षाचा नेता जनतेला देत असेल तर गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच नरेंद्र मोदी हे सुद्धा निर्भयाच्या कुटुंबांना भेटले होते. भाजपचे अनेक नेतेही गेले होते. तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा असं राष्ट्रीय महिला आयोग किंवा अन्य कुणी सांगितल्याचं आठवत नाही, असं राऊत यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल(४ ऑगस्ट) सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्ली छावणी परिसरातील पीडितेच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी आईवडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी याबद्दल माहिती दिली. “मी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांना न्याय हवाय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांची मदत करायला हवी. आम्ही मदत करू. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की, न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेल”, असं राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं आहे.

काय होतं प्रकरण?

दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव येथे मागास समाजातील एका नऊ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या आईवडिलांची परवानगी न घेताच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी हा आरोप केला असून, या प्रकरणाने उन्नावमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण तापताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलन प्रकरणी अभिनेता दीप सिद्धूला अटक

News Desk

अत्याधुनिक रायफल्स उत्पादनाच्या रशियाच्या प्रस्तावाला मोदी सरकारचा नकार

News Desk

राहुल गांधी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार ?

swarit