HW News Marathi
महाराष्ट्र

तरुणाचा वीजेच्या खांबावर दोन तास धिंगाणा, तारा तोडल्या

जालना : भोकरदन तालुक्यातील पारध बू. येथील एका माथेफिरुने बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चक्क विजेच्या खांबावर चढून विजेच्या तारा तोडून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. संदीप शंकर तबड़े (वय २५) असे या माथेफिरूचे नाव आहे. तो बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका विजेच्या खांबावर चढला. या वेळी या खांबावरून वीज प्रवाह सुरू होता. वर चढताच संदीपने मोठ्या आवाजात ओरडून अर्वाच्य भाषेत शिव्या देणे सुरू केले. यावेळी खाली जमलेल्या जमावाने त्यास ख़ाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर त्याने आपले डोके जोरजोरात खांब्यावर आदळण्यास सुरुवात केली.

या बाबत माहिती मिळताच विज कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान साधुन तात्काळ वीज प्रवाह बंद केला. वीज प्रवाह बंद केल्या नंतर संदीपने मुख्य विजेच्या तारा तोडून टाकल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खांबावर चढून त्या माथेफिरूला खाली उतरवले. दरम्यान, तारा तोडल्यामुळे संपूर्ण गावाला रात्र अंधारात काढावी लागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चौथीपर्यंतच्या शाळांना जोडणार पाचवीचा वर्ग!

News Desk

आता राज्यातील गोरगरिबांना १० रुपयांत मिळणार भोजन

News Desk

“उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल”

News Desk
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

भूसंपादनाची कारवाई सुरू असताना मंत्र्यांनी जमीन खरेदी केलीच कशी? विखे पाटील

News Desk

राज्यातील प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार – उदय सामंत 

News Desk

‘अजित पवारांचं नाव आम्ही कधी पासून घेतोय!’ जरंडेश्वर वरील कारवाई वर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

News Desk