HW News Marathi
मुंबई

अनुदानासाठी महाविद्यालयीन कर्मचा-यांचे बेमुदत उपोषण

पुणे – राज्यात २४ नोव्हेंबर २००१ पूर्वी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी पुणे येथील उच्च शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर महाविद्यालयीन कर्मचा-यांनी उपोषण सुरू केले आहे.

राज्यात दि .२४ नोव्हेंबर २००१ पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन स्तरावर कायम विना अनुदानाचे धोरण नसताना घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणीपूर्वी लक्षी प्रभावाने जून २००१ पासून लागू करून सदर महाविद्यालयावर घोर अन्याय केलेला आहे.यामुळे गेल्या १७ वषार्पासून विना वेतन विद्यादानाचे पवित्र काम करणाºया कर्मचारी व त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडे वेळोवेळी निवेदने, मोर्चे, आंदोलने, उपोषणाच्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न केला. परंतु शासनाने नेहमीच या प्रश्नाला केराची टोपली दाखवली म्हणून नाईलाजास्तव जीवाच्या आकांताने न्याय हक्कासाठी महाविद्यालयीन कर्मचारी उपोषणास बसले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा, लवकरच करणार राजकारणा एन्ट्री

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

पावसाचा मुंबईत कहर, अनेक ठिकाणी पाणी तुंबले, झाडे कोसळली

News Desk
महाराष्ट्र

सदाभाऊ खोत यांचीही नव्या पक्षाची घोषणा

News Desk

कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काडीमोड घेतल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेच्या स्थापनेचे संकेत दिले होते. त्यामुळे गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खोत यांनी त्यांच्या रयत क्रांती संघटना या नव्या संघटनेच्या नावाची घोषणा केली आहे. शेतकरी आणि कष्टकºयांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आपली संघटना असेल. वेळप्रसंगी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधातही आपण आवाज उठवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांच्यासोबत कोण जाणार याची खलबते सुरू आहेत. यावर बोलताना खोत यांनी जे कार्यकर्ते आपल्या सोबत येतील त्यांना सामावून आपण पुढे जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी आपले एकमात्र गुरु असल्याचे सांगत, शेती प्रश्नांवर लढण्यासाठी त्यांनीच वैचारीक पायाभरणी केली आहे. त्यामुळे संघटनेचा बिल्ला आपल्या छातीवर कायम असेल असे खोत यांनी म्हटले आहे.

Related posts

शिवेंद्रराजेंच्या मुलाखतीतील अनुपस्थितीवर अजित पवारांनी केली पाठराखण

News Desk

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन 

News Desk

संप सुरू असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार | एसटी महामंडळ

News Desk