HW News Marathi
क्राइम

आठ वर्षाच्या मुलाला सोडून आई पळाली

बर्कतभाई पन्हाळकर

कोल्हापुरयेथील राजारामपुरी अकरावी गल्ली येथे मारुती मंदिरात रात्री एका निर्दयी मातेने आपल्या आठ ते दहा महिन्याच्या तान्ह्या मुलीला सोडून पळुन गेली, ही माहिती महेश यांनी पोलिसांना दिली. मात्र पोलिस हाकेच्या अंतरावर असता देखील दोन तास उशिरा पोहोचले .यामुळे ती महिला पसार झाली.

महीलेने बाळाला सोडुन गेल्याने वातावरण भीतीचे व गंभीर झाले होते.

सोडुन गेलेल्या आईची माया गेली कुठे,त्याच वेळी माणुसकीतील माया जागी झाली आणि नगरसेविका प्रतिदन्या ऊत्तुरे, महेश ऊत्तुरे, अलताफ मकानदार, अनिल घोडके, अविनाश भोसले,धनपाल साठे, किरण साठे, रज्जत ओसवाल आदीनी या बाळाला, दुध, बिस्कीट ,कपडे दिले त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनला माहीती दिली. त्यानंतर चाईल्डचे प्रतिनीधी येवुन या बाळाला संगोपनासाठी ताब्यात घेतले.

केवळ पोलीस उशिरा पोहोचल्यामुळेच त्या बाळाला टाकून महिलेला पळून जाणे शक्य झाले. याला राजारामपुरी ठाण्याचे पोलीसच जबाबदार आहेत असा आरोप उत्तुरे यांनी केला.

ही महिला १३ वर्षाचा मुलगा दोघेही बँक ऑफ महाराष्ट्र व एका गॅरेजमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यामुळे पोलिसांनी आता तरी तिचा शोध घ्यावा, अशी मागणी उत्तुरेसह नागरीक करीत आहे.

हे बाळ त्या महीलेचे की दुसऱ्या कोणाचे आहे. ही महिला कोण व कोठुण आली, बाळाला सोडुन महिला का गेली, त्यांनी बरं वाईट करून घेतलं का असे अनेक प्रश्ऩ डोळ्या समोर ऊभे रहात आहेत,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तानकडून गोळीबार बीएसएफचा एक जवान शहीद

swarit

शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले

News Desk

म्हणून आता एटीएस पथक दिल्लीला जाणार….

News Desk
देश / विदेश

मार्शल अर्जन सिंह यांना भावपूर्ण निरोप

News Desk

नवी दिल्ली- एखेर मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांना सोमवारी दिल्लीतील बरार स्क्वेअरमध्ये शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.

अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. यावेळी अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ बंदुकांची सलामी देण्यात आली. याशिवाय फ्लाय पास्टदेखील करण्यात आला. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. १९६५ च्या युद्धावेळी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अर्जन सिंह यांना निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले. फील्ड मार्शलचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे हवाई दलाचे एकमेव अधिकारी होते.

Related posts

चीनने एकही गोळी न चालवता आपले २० जवान शहीद झाले ?, राऊतांचा मोदींना सवाल

News Desk

#MeToo : मला भीती दाखवून माझ्याशी संबंध प्रस्थापित केले !

Gauri Tilekar

गांधीजींचा फोटो भारतीय चलनातून काढा | हिंदू महासभा

News Desk