HW News Marathi
महाराष्ट्र

आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष भरकटविण्यासाठी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची शहांची खेळी !

पुणे। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देश पेटून उठला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२१डिसेंबर ) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “देशात आर्थिक मंदीवरून जनता केंद्र सरकार कोंडीत सापडत असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीची भरकटविण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीखेळी केली आहे. यासाठी त्यांचे त्यांचे अभिनंद अशा शब्दात राज ठाकरेंनी शहांवर टीका केली.

राज ठाकरे म्हणाले की, “आधार कार्डद्वारे लोक मतदान करतात, मग त्यावरुन नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही, आणि जर आधार कार्डाचा काहीही उपयोग नसेल तर त्यासाठी लोकांना रांगेत का उभे केले? हा सर्व खाटाटोप केला, तो कशासाठी होता?, आपल्या देशात १३५ कोटी लोक राहात आहेत. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार?,” असा सवाल करत राज ठाकरेंनी मोदी सरकारला केला. राज ठाकरे पुढे म्हणाले की, “सर्वांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. लोकांच्या सोयीसाठी हा देश नाही. माणुसकीचा ठेका केवळ भारताने घेतलेला नाही.”

घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी पोलीस सक्षम

राज ठाकरे म्हणाले की, “घुसखोरी करणाऱ्या लोकांना देशातून बाहेर काढायचे असेल, तर त्यासाठी आपले पोलीस सक्षम आहेत. पोलिसांना माहिती आहे की, बाहेरच्या देशातून आलेले लोक, प्रामुख्याने बांगलादेशातून आलेले घुसखोर कुठे राहतात? केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवायला हवी. आपल्याला शासकीय यंत्रणा सुधारण्याची गरज आहे, कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालन्यात १ कोरोना पॉझिटीव्ह, दादरच्या पोलिस स्टेशनमधील हा कर्मचारी आहे

swarit

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

News Desk

महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी – चंद्रकांत पाटील

News Desk