HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना रक्षाबंधनाची अनौखी भेट!

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत.

रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या

राष्ट्रवादीच्या महिलांनी हे आंदोलन वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी केला आहे. यावेळी पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव 25 रुपयांनी वाढवत देशातील सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती. याच प्रेमाखातर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या आहेत. या आंदोलनाची सुरुवात पुणे येथे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अच्छे दिनाची खोटी स्वप्नं दाखवून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या भावाला महागाईचे प्रतिक म्हणून शेणाच्या गोवऱ्या महिलांनी राज्यभरातून भेट म्हणून पाठवल्या आहेत, असं चाकणकर यांनी सांगितलं आहे.

महिलांना पुन्हा ‘चुलीकडे चला’

महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या पंतप्रधानांनी उज्वला गॅस योजना आणली. परंतु फक्त योजना आणून पोट भरत नसतं. दर 15 दिवसांनी स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा दर वाढतोय. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली, त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा ‘चुलीकडे चला’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असा संताप चाकणकर यांनी केला आहे.

सिलेंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली

सात वर्षांत गॅस सिलेंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी दर पंधरा दिवसांनी गॅस, पेट्रोल – डिझेल दरवाढ करून केंद्रसरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे त्या म्हणाल्या. सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, आज देशभरातील महिला भगिनी आपल्याला विचारतात, “क्या हुआ आपका वादा, महंगाईसे घर बेचना पडा आधा,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मोदी सरकारचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला

महागाईच्या प्रश्नावरुन मोदी सरकारचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी 440 रुपये असणारा हाच LPG गॅस आता 900 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला आहे.

एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनेतला वाऱ्यावर सोडून फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासत आहेत. गेल्या 8 महिन्यात केंद्र सरकारने 67 वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल 107 रुपये, डिझेल 96 रुपये लिटर झाले आहे. गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एसटी कर्मचाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात!”, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

News Desk

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि वेळेनुसारच होणार

News Desk

‘आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा’, यशवंत जाधवांचा आशिष शेलारांना टोला

News Desk