HW News Marathi
कृषी

केवळ 15 गुंठे जमीनमुळे मजूर झाला बागायतदार

सांगली- जिल्ह्यातील गोटखिंडी येथील अमोल दिलीप धेंडे हा तरूण एकेकाळी शेतमजूर म्हणून राब-राबत असे. आता मात्र तो प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जात आहे. भाजीपाला उत्पादनातून त्याने हे यश प्राप्त केले आहे. यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती तर सुधारलीच आहे, शिवाय सात जणांना त्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

सांगली जिल्ह्यात पेठ-सांगली रस्त्यावर इस्लामपूर शहरापासून पुढे १२ किलोमीटरवर गोटखिंडी फाटा लागतो. गावचा तसा बागायती उसाचा पट्टा. या गावात अमोल धेंडे शेतमजूर म्हणून काम करत होता. अमोल आपल्या कुटुंबासह राबतो हे गावातील मित्रांना माहीत होते. गावातील एक शेतकऱ्याची १५ गुंठे जमीन मुदत खरेदीसाठी निघाली होती. अमोलच्या कुटुंबाने रोजगारातून काही रक्कम गाठीला ठेवली होती. मित्रांनी काही रक्कम दिली आणि ते १५ गुंठे क्षेत्र मुदत खरेदी केले. त्या ठिकाणी पाण्याची सोय होती. पहिल्याच वर्षी हळदीचे पीक घेतले. संपूर्ण कुटुंबाने राबून ते चांगले आणले. पहिल्याच वर्षी सव्वा लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. याच प्रयोगानंतर धेंडेकुटुंबाचा इतरांच्या शेतातला रोजगार संपला. शेतीत आणखी काही करण्याची उमेद वाढली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी मदतीबाबत सरकारने शब्द फिरवल्यास हक्कभंग आणणार ! विखे पाटील

News Desk

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

News Desk

महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार जाहीर

swarit