HW News Marathi
क्राइम

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली – सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमोल नामदेव पतंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नांदेड येथे स्फोटकाचा अवैध साठा जप्त, दोघांना अटक

News Desk

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या होणार निवृत्त

Aprna

मालकाच्याचं घरी डल्ला मारणाऱ्या चोरट्याला 24 तासात अटक; 46 लाखांच्या मालमत्तेस बिहारमधून घेतले ताब्यात

Chetan Kirdat
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन, सीबीआयच्या विनंतीनंतर ६ आठवड्यांची स्थगिती

swarit

शिवसेना नगरसेवकावर बलत्काराचा गुन्हा दाखल

News Desk

एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन

News Desk