HW News Marathi
मुंबई

मुंबई विद्यापीठाविरोधात विद्यार्थी न्यायालयात

मुंबई : निकाल जाहीर करण्यात मुंबई विद्यापीठाकडून होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच या भोंगळ कारभाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा, अशी विनंती विद्यापीठातील विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

परीक्षा होऊन सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरीही विद्यापीठाला अद्याप निकाल जाहीर करता आलेला नाही. उत्तर पत्रिका ऑनलाइन तपासण्याच्या निर्णयामुळे हा घोळ झाला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांपुढे करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुणपत्रिका नसल्याने देशातील व देशाबाहेरील विद्यापीठांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे लॉच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याशिवाय लॉचा निकाल तीन दिवसांत लावावा व करिअरशी खेळ केल्याने,प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांना मुंबई विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात आदेश देण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशीही मागणी सचिन पवार, अभिषेक भट व रविशंकर पांडे यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी

News Desk

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

News Desk

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरवी बुरशी; ‘या’ राज्यात आढळला पहिला रुग्ण

News Desk

राम मंदिरसाठी ‘ट्रस्ट’ची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे अभिनंदन

swarit

मथुरा-वृंदावन रंगले श्रीकृष्ण रंगी

Gauri Tilekar