HW News Marathi
मुंबई

मुंबई विद्यापीठाविरोधात विद्यार्थी न्यायालयात

मुंबई : निकाल जाहीर करण्यात मुंबई विद्यापीठाकडून होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच या भोंगळ कारभाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा, अशी विनंती विद्यापीठातील विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

परीक्षा होऊन सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरीही विद्यापीठाला अद्याप निकाल जाहीर करता आलेला नाही. उत्तर पत्रिका ऑनलाइन तपासण्याच्या निर्णयामुळे हा घोळ झाला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांपुढे करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुणपत्रिका नसल्याने देशातील व देशाबाहेरील विद्यापीठांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे लॉच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याशिवाय लॉचा निकाल तीन दिवसांत लावावा व करिअरशी खेळ केल्याने,प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांना मुंबई विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात आदेश देण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशीही मागणी सचिन पवार, अभिषेक भट व रविशंकर पांडे यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबार सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करावे! – अस्लम शेख

News Desk

भाजपा 60 जागांवर नाखूष – शेलार

News Desk

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

swarit