HW News Marathi
देश / विदेश

चेटकीण ठरवून महिलेला विष्ठा खायला लावली,हालहाल करून क्रूर हत्या

अजमेर : सुधारकांनी असंख्य प्रयत्न करून आणि देशभरात कठोर कायदे करूनही भारतीय समाजाच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रद्धेचे भूत अद्यापही उतरायला तयार नाही. नरबळी, जादूटोण्याच्या घटना अधूनमधून देशभरात कुठे ना कुठे उघडकीस येत असतात. असाच एक अमानवी प्रकार राजस्थानातील अजमेरमध्ये नुकताच उघडकीस आला. चेटकीण असल्याच्या संशयावरून एका महिलेची नातेवाईकांकडून नग्न धिंड काढण्यात आली. तसेच तिला विष्ठा खायला लावण्यात आली आणि निखाऱ्यांवर झोपवून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली.

कन्या देवी असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव असून ती विधवा होती. २ ऑगस्ट रोजीतिच्या दोन नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी तिला हाल करून मारले. या भीषण हत्याकांडानंतरकदेरा गावातील जातपंचायतीने आरोपींना पुष्कर तलावात स्नान आणि गुरांसाठी ट्रॅक्टरभर चाऱ्याची सोय करण्याचे प्रायश्चित घ्यायला लावून त्यांची निर्दोष मुक्तता केली. तसेच पोलिसांकडे गेलात, तर समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी कन्या देवी यांच्या कुटुंबियांना जातपंचायतीकडून देण्यात आली.

कन्या देवी त्यांच्या १५ वर्षांच्या मुलाबरोबर घरी झोपल्या असताना नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांना पकडले आणि अमानुष छळ करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पाच जणांवर हत्या आणि अन्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आलीआहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कन्यादेवी यांची पुतणी पिंकी, पुतण्या महावीर आणि शेजारीराहणारी सोनिया यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

भैरव बाबा हा मांत्रिकाने कन्यादेवी चेटकीण असल्याचे सांगून तिला ठार मारायला सांगितले होते, असा असे आरोपींचे म्हणणे आहे. परंतु, हे प्रकरण संपत्ती हडपण्यासाठी झाल्याचे पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

हे प्रकरण लावून धरणाऱ्या तारा अहुवालिया यांनी या सगळ्यापाठी संपत्तीचा वाद असल्याचा आरोप केला आहे. कन्या देवी यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचा मुलगाही लहान आहे. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांची संपत्ती आण जमीन हडपायची होती, असे अहुवालिया यांनी सांगितले.

सुरूवातील कन्या देवी यांच्या मृत्यूची कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती. मात्र, त्यांचा भाऊ महादेव रेगार कन्या यांच्या अंत्यविधीसाठी गेला असताना सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने ८ ऑगस्टला पोलिसांना याबद्दल कळवले. मात्र, सुरूवातीला पोलिसांनी पुरावे सादर करा,असे सांगून त्याची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर कन्या देवींची मुलगी माया हिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर पोलिसांनी पाच आरोपींवर हत्येचा , पुरावे नष्ट करणे,अंधश्रद्धा कायद्याचे उल्लंघन आणि अनैसर्गिक मृत्यूच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची वर्णी लागणार ?

News Desk

प्रा. अभय अष्टेकर यांना आइन्स्टाईन पुरस्कार

News Desk

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

swarit