HW News Marathi
महाराष्ट्र

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

सांगलीः अवघ्या काही तासांववर लग्नसोहळा आला होता. नवरदेव मोठ्या उत्साहत मेकअप करण्यात व्यस्त होता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच ठरलेले होते. नवरदेवला अचानक अस्वस्थ वाटू लागले. घामाघुम होऊन तो खाली कोसळला आणि क्षणार्धात त्याचे प्राण गेले. मनाला चटका लावणारी घटना सांगली जिल्ह्यातील मीरज येथे घडली. रवी मदन पिसे (वय २७, रा. शिवाजी पुतळा, मिरज) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे. त्याचे शनिवारी लग्न होते. त्यासाठी शाही दरबारात जय्यत तयारी करण्यात आली होती. दोन्हीकडील मंडळी आनंदी असताना नवरदेवाल ह्रदयविकाराचा झटका आला. शुक्रवारी हळदीचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यानंतर हॉलवरून आज सकाळी तयारी करण्यासाठी नवरा मुलगा तानाजी चौकातील आपल्या घरी आला होता. साडे अकराचा लग्नाचा मुहुर्त होता. मात्र, सकाळी साडे नऊ वाजता त्याच्या छातीत जोराची कळ आली आणि तो चक्कर येऊन खाली कोसळला. या प्रकारानंतर नवऱ्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात केला कोर्टात दावा’, शिवसेना राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी!

News Desk

उल्हासनगरात गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मृतदेहासह ठिय्या आंदोलन

News Desk

आदित्य ठाकरे ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार ?

News Desk
मुंबई

दहीहंडीला मूक दिन पाळण्याचा निर्णय

News Desk

मुंबईः यंदा १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि दहीकाला एकाच दिवशी असले, तरी याच दिवशी राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशन या संघटनेने (पाला) राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात स्वातंत्र्य दिन व दहीहंडी उत्सवादिवशी लाउडस्पीकर व लायटिंग बंद ठेवणार असल्याचे पालाने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. लाऊडस्पीकरच्या उद्योगावर भवितव्य अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आहेत. मात्र, राज्यातील लाऊडस्पीकरच्या बंदीमुळे प्रकाश, ध्वनीशी संबधित असलेला हा उद्योग अडचणीत सापडला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ७५ डेसिबलचे बंधन पाळावे लागते. मात्र वाहतुकीच्या आवाजांसह वातावरणातील ध्वनीची पातळी वाढत आहे, त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी ‘पाला’ संघटनेने केली आहे.

Related posts

इंद्रायणीने पती पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली

News Desk

पुण्यात चोविस तासाच दोन ठिकाणी गोळीबार

News Desk

धारावीतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून डी आर पी योजनेत समाविष्ट करा | चंद्रकांत पाटील

News Desk