HW News Marathi
राजकारण

आज पंतप्रधान मोदींची मुंबईत तर शरद पवारांची ठाण्यात प्रचार सभा

मुंबई | पंतप्रधान मोदी यांची आज (२६ एप्रिल) मुंबईत एमएमआरडीए मैदानात सभा होणार आहे. संध्याकाळी ७ च्या सुमारास पंतप्रधान मोदींची ही सभा पार पडेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील आज डोंबिवली आणि ठाण्यात प्रचार सभा होणार आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यांपैकी पहिल्या ४ टप्प्यात महाराष्ट्रासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यापैकी ३ टप्प्यांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आता केवळ १ टप्पाच शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रातील हा चौथा, शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सोमवारी (२९ एप्रिल) पार पडणार आहे. शनिवारी (२७ एप्रिल) या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यामुळे बहुतेक राजकीय पक्ष हे आजच मुंबईसह ठाण्यात प्रचारसभा घेणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या या मुंबईतील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अन्य दिग्गज नेते देखील उपस्थित राहतील. उद्धव ठाकरे हे गुरुवारी (२५ एप्रिल) मध्यरात्रीच पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ११.३० च्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित असतील. त्यानंतर ते दुपारी १ वाजता मुंबईसाठी रवाना होतील. संध्याकाळी मुंबईत पार पडणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत देखील ते उपस्थित असतील. पंतप्रधान मोदी, शरद पवार यांच्यासह भिवंडी आणि मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या देखील सभा होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

INX Media Case: पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

News Desk

शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा! पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

Aprna

नागपूर NIT घोटाळ्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक; मुख्यमंत्री स्पष्टीकरण देत म्हणाले…

Aprna
राजकारण

संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढवणार

News Desk

पुणे | संभाजी ब्रिगेडने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक लढा तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा याबाबत पुढाकार घेतला आहे. ग्रामपातळीवर याविषयी प्रबोधन केले आहे. तसेच जनसामान्यांचे प्रश्‍न जाणून घेतले आहेत. जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, संभाजी ब्रिगेड येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी दिली.

चिंचवड येथे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावाप्रसंगी मार्गदर्शन करताना सुधीर देशमुख बोलत होते. जनसामान्यांच्या प्रश्‍नाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अनेक अडचणी जाणवल्या आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने स्वतः राजकारणात येऊन लोकांच्या समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे.

Related posts

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

Aprna

भागवत आणि मोदींकडे एके ४७ कुठून आल्या ?

News Desk

प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी ठरणार ?

News Desk