HW News Marathi
Uncategorized

मुंबईत टीबीने रोज मरतात १८ जण; महिला सर्वाधिक

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रुग्ण दूरदूरहून वैद्यकीय उपचारांसाठी येतात. अनेक आसाध्य आजार आटोक्यात आणू शकणारी वैद्यकीय व्यवस्था इथे असल्याने परदेशातूनही रुग्ण येथे येतात. नुकतीच इमाम या अतिलठ्ठ महिलेवरही येथेच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आधुनिक उपचारांमुळे आता तितकासा असाध्य न राहिलेल्या यक्षरोग अर्थात टीबीला वेसण घालण्यात आरोग्य यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे महानगरी मुंबईत आजही टीबी सरासरी १८ जणांचे बळी घेत असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबईतील विविध समस्यांचा सर्वेक्षणाद्वारे आढावा घेण्याचे काम करणाऱ्या प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने नुकताच याबाबतच त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. टीबीमुळे बळी जाणाऱ्या या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचेही संस्थेचे म्हणणे आहे. महिलांना आजही अनेक कुटुंबांमध्ये दुय्यम स्थान आहे. कुटुंबाची काळजी घेताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तसेचसामाजिक दडपणामुळेही त्या टीबीची लागण झाल्याचे सांगत नाहीत, असे निरीक्षण फुप्फुसरोग व श्वसनविकार तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

महिलांमध्ये टीबीमुळे फुप्फुसांसोबत मुत्रपिंड, मणका,मेंदू तसेच हाडांवरही परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, उपवास, सतत डाएटिंग, जागरण,अतिरिक्त रक्तस्राव यामुळे रोगप्रतिकारशक्ती खालावून महिलांमध्ये टीबीची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. भारतात शहरी भागातील दर ५० पैकी आठ महिलांना टीबीची लागण झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. टीबीचा संसर्ग झाल्याचे कळले, तर लग्न जुळणार नाही, ही प्रमुख धास्ती २० ते २५ वयोगटातील मुलींना असते. त्यामुळे आजार असूनही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये टीबीची नोंद केली जात नाही, असेही तत्ज्ञांचे मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारी आसाराम बाबाला जामीन नाहीच

swarit

Sanjay Gaikwad आणि Narayan Rane यांची एकमेकांवर विखारी टीका!

News Desk

अभिनेता सुशांतच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता मुंबईत होणार अंत्यसंकार

News Desk