HW News Marathi
देश / विदेश

एप्रिलमध्ये मोदी- शरीफ यांच्यात होऊ शकते चर्चा ?

नवी दिल्ली- उरी हल्ल्यानंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होऊ शकते. एप्रिल महिन्यात इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या बैठकीसाठी भारताने तयारी दाखवल्याची माहीती मिळतेय.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोन्ही देशात याविषयी चर्चा झाली होती. यापुर्वी 2005 मध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सीमध्ये झालेल्या एका करारानुसार दोन्ही देश बेकायदेशीर जहाजे, महासागर प्रदूषण तसेच नैसर्गिक संकटाबाबत माहिती देतील असे ठरले होते. मागच्या वर्षी म्हणजेच 2016 मध्ये हा करार 5 वर्षांनी वाढवण्यात आला होता. तसेच यावर्षी जून महिन्यात शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन होणार आहे. या पार्श्वभूवमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याचीही दाट शक्यता आहे. मागच्या आठवड्यात नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. पत्रामध्ये पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असा ऊल्लेख त्यांनी केला होता. यासर्वांवरुन हेच लक्षात येत आहे की यावेळी नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद आणि उरी हल्ला अशा विषयांवरही चर्चा होऊ शकते. तसेच मैत्रीपुर्व विषयावरही यावेळी काही बोलणं होऊ शकेल याबाबत दाट शक्याता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चारा घोटाळाप्रकरणी CBI विशेष न्यायालयाकडून लालू प्रसाद यादव दोषी

Aprna

87 वर्षाचा पोस्टमन निघाला 1300 बालकांचा बाप

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढणे अशक्य

News Desk
देश / विदेश

युनिटेकच्या चंद्रांना अटक

News Desk

नवी दिल्ली युनिटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. काही वर्षांपूर्वी ग्रेटर नोएडा येथील घरबांधणी प्रकल्पात युनिटेक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. या खरेदीदारांनी २००६ मध्ये ग्रेटर नोएडामध्ये घरांसाठी पैसे भरले होते. एप्रिल २००८ मध्ये या घरांचा ताबा मिळेल, असे कंपनीतर्फे खरेदीदारांना सांगण्यात आले होते. मात्र, युनिटेक कंपनीला नियोजित वेळेत ग्राहकांना घरे देण्यात अपयश आले होते. गेल्यावर्षी दिल्लीतील न्यायालयाने याप्रकरणी युनिटेकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी जानेवारी २०१६ मध्येही संजय चंद्रा यांच्यासोबत युनिटेकचे अध्यक्ष रमेश चंद्रा, एमडी अजय चंद्रा आणि संचालिका मिनोती बाहरी यांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांना एक दिवस तुरूंगात राहवे लागले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०१६ रोजी या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये ITBP जवानांच्या बसला भीषण अपघात

Aprna

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Aprna

दहशतवाद्यांना जिवंत राहू दिले जाणार नाही

News Desk