HW News Marathi
राजकारण

मोदी ज्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खिशातून आम्ही न्याय योजनेसाठी पैसे आणणार !

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकाबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. “नागरिकत्व विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नाही”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिले आहे. “न्याय योजनेसाठी कुठून पैसा आणणार असे आम्हाला विचारले जाते. त्यावर आमचे असे उत्तर आहे कि मोदी या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा चोरांच्या खिशातून आम्ही यासाठी पैसे आणणार आहोत”, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

सत्तेत आल्यास काँग्रेस भारतातील २० टक्के गरीब जनतेच्या खात्यात ५ वर्षांत ३ लाख ६० हजार रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे गेल्या ५ वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी कोट्यावधी लोकांना बेरोजगार केले. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी केवळ मोठमोठी आश्वासने दिली. मात्र, त्यातले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. कोणाच्याही खात्यात १५ लाख आले नाहीत”, आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे . त्याचप्रमाणे, काँग्रेस सत्तेत आल्यास कोणालाही विनापरवानगी व्यवसाय करता येईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडचिरोलीत आज ४ मतदान केंद्रांवर फेरमतदानाला सुरुवात

News Desk

आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही !

News Desk

…म्हणून ह्यांना एक प्रकारचा माज आलाय !

News Desk